मुंबई (वृत्त संस्था) : राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती चिंताजनक असल्याने राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा फेसबुक लाईव्हद्वारे केली आहे. या पंधरा दिवसांत साखळी तोडण्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. सोबतचं या काळात सर्वसामान्य गटातील नागरिकांसाठी मदत जाहीर केली आहे.
काय आहेत निर्बंध?
उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार आहे.
मंगळवेढा-पंढरपूरमध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील.
उद्या संध्याकाळपासून राज्यात 144 कलम चालू.
पुढचे 15 दिवस संचारबंदी.
अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे.
घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये.
आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील.
किराणा, भाजीपाला दुकान, दूध डेअरी सकाळी 7 ते रात्री 8 सुरु राहतील
रुग्णालये व संबंधित सेवा, शीतगृहे, वेअर हाऊसिंग, बँका व सेबीशी संबंधित सेवा, दूर संचार सेवा, ई-कॉमर्स, पेट्रोल पंप सुरू राहणार.
सरकारी कार्यालय, वाहतूक सुरु राहतील
सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील.
महिनाभर गोरगरिबांना मोफत शिवभोजन देणार.
जनावराचे रुग्णालय सुरु राहतील.
पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील.
अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहील.
हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहतील.
रस्त्यावरच्या ठेले वाल्यांनाही टेक अवेची घोषणा.
प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदुळ- 7 कोटी लोकांना देण्यात येईल एक महिना मोफत
वयोवृदध, महिला, आदिवासी, निराधार लोकांना 2 महिन्यांकरता हजार रुपये 35 लाख लोकांना देत आहोत.
नोंदणीकृत बांधकाम मजूरांना आणि घरकाम करणा-या लोकांना मदत करत आहोत.
अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देत आहोत.
नोंदणी असलेल्या रिक्षाचालकांना 1500 रुपये देत आहेत